अमरावती, दि. २४ ऑक्टोबर २०२५: तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार ग्रामपंचायतीतील कागदोपत्री मुळ दस्तावेजांमध्ये खोड तोड आणि गैरकायदेशीर खरेदी प्रक्रियेच्या व अनियमितता व भ्रष्टाचारप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे उपोषण आज नवव्या दिवशीही सुरूच आहे. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चालू असलेल्या या अन्नत्याग उपोषणस्थळी पंचायत समिती तेल्हारा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सहाय्यक बीडिओ यांनी भेट देऊन सीईओ अकोला यांच्याकडे चौकशी अहवालाचा प्रस्ताव पाठविला असल्याचे सांगितले. मात्र, आखरे यांनी याबाबत संशय व्यक्त करत उपोषण सोडण्यास नकार दिला.25 ऑक्टोबर २०२५ रोजी तयार झालेल्या चौकशी अहवालानुसार, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मूळ दस्तऐवजात खोड तोड घातली असून, खरेदी प्रक्रियेत अनियमितता केल्या आहेत. यात लाखो रुपयांचा गैरफायदा झाल्याचे नमूद आहे. तरीही जिल्हा परिषदेने हेतुपुरस्सर दोन महिने विलंब केला आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आखरे यांनी केला. “जोपर्यंत सरपंच सचिव यांच्यावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही,” असे बीडिओ यांना ठामपणे सांगितले.प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आखरे यांच्या या लढ्याला स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. उपोषणामुळे त्यांच्या तब्येतीत बिघाड होण्याची भीती व्यक्त होत असली तरी, भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई यशस्वी होईल, असा विश्वास आखरे यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र होईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. या प्रकरणाने ग्रामीण विकास योजनांतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला असून, पारदर्शक कारवाईची मागणी वाढली आहे.
Home महाराष्ट्र अमरावती येथिल विभागिय आयूक्त कार्यालय येथे चालू असलेल्या अन्नत्याग उषोणावर प्रहार ता...





