संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आज नागपूरच्या वेशीवर प्रचंड शक्तीप्रदर्शन केले. नागपूर–हैदराबाद, नागपूर–जबलपूर तसेच समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत वाहतूक पूर्णतः ठप्प केली.या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांनी केले. त्यांनी राज्य सरकारला उद्यापर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा, अन्यथा नागपूरमध्ये रेल्वे रोको आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.शेतकऱ्यांनी “जय जवान, जय किसान” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अनेक ठिकाणी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,> “शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, पण त्याला कर्जाच्या ओझ्याखाली दबवले जात आहे. सरकारने केवळ आश्वासनांवर शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता आम्ही थांबणार नाही — संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”दरम्यान, प्रशासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चेचा प्रयत्न सुरू केला असला तरी, ठोस निर्णय न घेतल्यास उद्यापासून नागपूरसह राज्यभर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Home Breaking News संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र — नागपूरच्या वेशीवर हजारोंचा जमाव, महामार्ग ठप्प!








